Sunday 28 August 2016

 
मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सदाबहार अभिनेत्री राधा कुलकर्णी (सागर)
"गुड मॉर्निंग" या मराठी चित्रपटा मध्ये प्रमुख भुमिका असलेली गुणी अभिनेत्री "राधा कुलकर्णी" यांनी मराठी रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरवात केली. घाशीराम कोतवाल, आई रिटायर होतेय, आती रहेंगी बहारे अशा दर्जेदार नाटका मधुन आपली अप्रतिम भुमिका साकार केली आहे. नाती खेळ,या चित्रपटात प्रमुख भुमिका, एक अलबेला, वजनदार, कालचक्र, या मराठी चित्रपटात काम करीत असताना प्रत्येक अभिनय दर्जेदार करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. झी मराठीवर कन्यादान हि मालिका खुप गाजली त्या मध्ये किट्टू हे कॅरेक्टर साकारले त्यामुळे राधा कुलकर्णी हे नाव घराघरात पोहोचले आहे. स्टार प्रवाहावरील जयस्तुते, कलर्स मराठीवर एक मोहोर अबोल, स्टार प्रवाह वरील लक्ष्य, झी मराठीवरील अस्मिता या कार्यक्रमामधुन अभिनयाची गगन भरारी घेणाऱ्या अभिनेत्री राधा कुलकर्णी यांनी गुड मॉर्निंग या मराठी चित्रपटात सुद्धा अविस्मरणीय भुमिका पार पाडली. पहिल्याच दिवशी राधाजींची ओळख झाली. कुठलाच मोठेपणा त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला नाही. आपल्या अभिनयाशी एकरूप होऊन तो अभिनय सहजपणे त्या साकारीत होत्या. त्यांच्या सोबत राज्या हा नविन त्यात तो मुक बधिर पण राधाजी त्याला प्रेमाने प्रत्येक गोष्ट समजावीत होत्या, त्यामुळे राजाला त्यांचा खुप आधार वाटत असे. राज्याला कोणी बोलले तरी त्या बोलणा-यावर रागावत असत. एक दिवस घरच्या आठवणी मुळे राज्या उदास होता रडत होता राधाजींनी त्याला जवळ घेतले समजावले त्याच्या बरोबर त्या सुद्धा भावनिक झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. सह कलाकाराला समजुन घेण्यात किती मोठेपणा त्यांच्या अंगी होता ते जाणवले. शुटिंग च्या दरम्यान उन्हाळा असल्याने प्रचंड गरम होत होते पण राधाजींनी कसलीच तक्रार केली नाही. प्रत्येक सीनस दिग्दर्शक करण तांदळे यांना विचारत असत तुला आवडला का नसेल आवडला तर आपण पुन्हा रीटेक घेऊयात इतका समजदार पणा इतक्या मोठ्या कलाकारांन मध्ये क्वचित पहायला मिळतो. शूटिंगच्या दरम्यान त्यांची भूमिका संपली तरी त्या आवर्जून सेट वर थांबत असत प्रत्येकाला अभिनयासाठी प्रोत्साहन देत असत. राधाजींनी कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. आहे त्या वातावरणाशी जुळवून घेतले. एक दिवशी रात्री पळण्याचा शाॅर्ट होता. तो खुप वेळा घेतला गेला पळुन पळून इतर सर्व जण थकून गेले पण राधाजी अजिबात थकल्या नाहीत खरच सदाबहार असे व्यक्तीमत्व आमच्या या चित्रपटाला लाभले हे आमचे भाग्य समजतो. त्यांची दर्जेदार भुमिका नक्कीच रसिकांना आवडेल यात शंकाच नाही
लेखन :- संदिप राक्षे


No comments:

Post a Comment